पोस्ट्स

दु:खद घटना आणि एक निराधार आरोप

भाग 1: अलीकडील दुःखद घटना आणि सोशल मीडियाची भूमिका नुकत्याच झालेल्या हत्येच्या घटनेने संपूर्ण देश हादरला असून सर्वांमध्ये शोकाचे वातावरण आहे. या काळात सरकार, कायद्याची अंमलबजावणी आणि न्याय व्यवस्थेकडून गुन्हेगारांना न्यायाच्या कक्षेत आणावे अशी लोकांची स्वाभाविकपणे अपेक्षा असते. मात्र, या दु:खद काळात काही धर्मांध घटक परिस्थितीचा फायदा घेऊन जातीय द्वेष पसरवण्याचा, समाजात तेढ निर्माण करून हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुस्लिमांविरुद्धच्या धमक्या, त्यांच्या जीवावर होणारे हल्ले आणि द्वेषपूर्ण वक्तृत्व ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे पसरत आहेत, ज्यामुळे भीती आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण होत आहे. अशा अशांत काळात, न्याय मिळावा आणि हिंसाचार किंवा जातीय तणाव वाढू नये यासाठी राज्य, नागरी समाज आणि जबाबदार नागरिकांनी एकत्र येणे अत्यावश्यक आहे. 1. सरकार आणि कायद्याच्या अंमलबजावणीची भूमिका a) त्वरित आणि निष्पक्ष तपास: सरकारने या हत्येच्या घटनेचा जलद आणि निष्पक्ष तपास केला पाहिजे. गुन्हेगारांची ओळख पटवून त्यांना कायदेशीर प्रक्रियेनुसार शिक्षा झाली पाहिजे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या...

सत्याचा शोध: हिंदू धर्मग्रंथांचे फारसी आणि उर्दू भाषांमध्ये अनुवाद

सत्याचा शोध: हिंदू धर्मग्रंथांचे फारसी आणि उर्दू भाषांमध्ये अनुवाद कुरशिद इमाम सत्याचा शोध: हिंदू धर्मग्रंथांचे फारसी आणि उर्दू भाषांमध्ये अनुवाद हिंदू धर्मग्रंथांच्या अनुवादांबद्दलचा आक्षेप धर्मग्रंथांचा अनुवाद हा विविध संस्कृतींमधील ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. भारतात, मुस्लिम लेखकांनी हिंदू धर्मग्रंथांचे फारसी आणि नंतर उर्दू भाषेत अनुवाद केले. काही लोकांचा असा आक्षेप आहे की या अनुवादांमुळे हिंदू धर्माचा अपमान झाला किंवा त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. हा लेख या आक्षेपांचा अभ्यास करतो आणि ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे सत्य उघड करण्याचा प्रयत्न करतो. धर्मग्रंथांच्या अनुवादाचे ऐतिहासिक उदाहरण १. अब्बासी खलिफांचे युग: ग्रीक ग्रंथांचे अरबी अनुवाद अब्बासी खलिफांच्या (८व्या ते १०व्या शतकाच्या) काळात ग्रीक विज्ञान आणि तत्त्वज्ञानाचे ग्रंथ अरबी भाषेत अनुवादित झाले. बगदादमधील हाऊस ऑफ विझडम मध्ये अरिस्टॉटल, प्लेटो यांसारख्या तत्त्वज्ञांचे लेखन अरबीमध्ये भाषांतरित झाले. याचा उद्देश ज्ञान पसरवणे हा होता, विकृती नाही. २. रोमन साम्राज्य: ग्रीक ते लॅटिन अनुवाद रोमन साम्राज...

इस्लाम मध्ये युद्ध

 इस्लाम मध्ये युद्ध बाबा - "अल्बर्ट! खेळायला बाहेर जाऊ नको. बाहेर जोरदार पाऊस पडत आहे." अरे! तर अल्बर्टच्या वडिलांनी "खेळायला जाऊ नको" असे सांगितले. याचा अर्थ असा आहे की त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी कायमची खेळण्यास मनाई केली आहे. याचा अर्थ वडिलांच्या आदेशामुळे अल्बर्ट कधीही कोणताही खेळ खेळू शकत नाही.  वाचक कृपया माझ्या चुकीच्या निष्कर्षामुळे माझ्यावर रागावू नका. आपणास हे स्पष्टपणे समजले आहे की मी संपूर्ण पार्श्वभूमी आणि परिस्थिती प्रदान न करताच संदर्भ स्पष्ट सांगितला आहे. माझा वरील निष्कर्ष चुकीचा आहे. योग्य निष्कर्ष असा असेल - "अल्बर्टच्या वडिलांनी त्याला पावसात न खेळण्यास सांगितले आहे (अर्थात; कारण कदाचित त्याला ताप येऊ शकेल). सामान्य दिवसात तो खेळू शकतो. " काहीसे असेच प्रकरण आहे ज्यात इस्लामवर दहशतवाद किंवा हिंसाचाराचा प्रचार करण्याचा आरोप जातो. चला, निष्पक्ष मनाने या विषयाकडे पाहूया. आपण आपल्या सभोवतालच्या वातावरणातून काय शिकत आहोत त्याऐवजी मजकूरावर (लिखित साहित्य) अवलंबून राहू या.   अ ) इस्लाम म्हणजे शांतता व सुरक्षा इस्लाम हे दुसरे काही नसून ईश्वरा...

प्रेषित यूनुस यांच्या कथेतील 4 धडे.

इमेज
  प्रेषित यूनुस यांच्या कथेतील 4 धडे. 1: आपले पाप ओळखा आणि क्षमा मागा. जेंव्हा मासा समुद्राच्या तळाशी आला तेव्हा प्रेषित युनुस यांना आपली चूक लक्षात आली, तेव्हा त्यांनी माशाच्या पोटातच डोके खाली टेकवले आणि ईश्वराकडे क्षमायाचना केली. 2: ईश्वराच्या दयेपासून निराश होऊ नका. त्यांनी त्यांच्या दुर्दैवावर शोक केला नाही आणि धीर सोडला नाही. त्याऐवजी, त्यांनी आपले हात ईश्वराच्या दिशेने वर उचलले. " आम्ही त्याला प्रतिसाद दिला, आणि त्रासापासून वाचवले. अशाप्रकारे आम्ही विश्वास ठेवणाऱ्या लोकांची मदत करतो." (कुरआण 21:88) 3: सत्याकडे आमंत्रित करण्याच्या कार्यामध्ये संयमाचे महत्व. आपल्या प्रयत्नांची फळे मिळण्यासाठी वेळ लागेल. हे पण शक्य आहे की आपले मित्र मंडळी किंवा कुटुंबतील सदस्य ही सत्य स्वीकारनार नाहीत,  जरी आपण बर्‍याच वर्षांपासून त्यांच्यापर्यंत संदेश पोहचवत आहोत. याचा अर्थ असा नाही की तुम्ही निराश होऊन आपले कार्य बंद करावे. 4:  स्मरण ( ईश्वराची आठवण) आणि प्रार्थना (ईश्वराला मदत मागणे) ही तुमची सर्वात शक्तिशाली साधने आहेत. प्रेषित युनुस यांच्या लक्षात आले की, समुद्राच्या तळाशी राहणार...

ईश्वर एक आहे; अनेक नाही - पंडित श्री राम शर्मा आचार्य

इमेज
 * ईश्वर एक आहे; अनेक नाही. *  पंडित श्री राम शर्मा आचार्य [हिंदू धर्माचा एक महान अधिकार आणि गायत्री परिवारीचा संस्थापक]         या विश्वाचा निर्माता फक्त एक आहे.   केवळ तोच आहे, जो उत्पादन, प्रसार, किंवा भिन्नता या सर्व प्रक्रिया आपल्या योजनेनुसार पूर्ण करतो.  त्याचा कोणी साथीदार किंवा मदत करणारा नाही. सर्वांचा स्वार्थ एकत्र आहे. एकाच ईश्वराची सत्ता वेगवेगळ्या प्रकारची झाली आणि असे समजण्यात येऊ लागले, जे ज्या देवी देवतांची पूजापाठ करतील ते त्याच देवाला आपले समजतील आणि त्याचेच समर्थन करतील.  एका ईश्वराचे राज्य वेगवेगळ्या देवांमध्ये ठरविले गेले आणि लोक असे विचार करू लागले की ते आपल्या स्वत:च्या निवडलेल्या देवाची उपासना आणि समर्थन करतील. आणि ते येथेच थांबले नाहीत, जे लोक त्यांच्या देवांना मान्य करणार नाहीत किंवा त्याच्या विरोधात असतील त्यांना त्रास देण्याचे समर्थन केले.   ही मान्यता आहे आजच्या बहुदेववादाची.  अशाप्रकारे केवळ सृष्टी चा निर्माता अनेक गटात विभागला गेला नाही तर, प्रत्येक वंश, गाव आणि शहर यांचे सुध्दा वेगवेगळ...

आपण ईश्वरावर प्रेम केले पाहिजे की ईश्वराचे भय बाळगले पाहिजे?

आपण ईश्वरावर प्रेम केले पाहिजे की ईश्वराचे भय बाळगले पाहिजे? प्रश्न: आपण ईश्वरावर प्रेम केले पाहिजे किंवा ईश्वराचे भय बाळगले पाहिजे? माझा विश्वास आहे की, भीती ही ईश्वराचे आज्ञापालन करण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे. *************** उत्तरः अरबी शब्द "तकवा" हा सहसा "भीती" म्हणून चुकीचा अनुवाद केला जातो. मूळ शब्द "वाव काफ या"  हे प्रेमास एकरूप करते.  आपण प्राणी, भूत किंवा वाईट लोकांना घाबरतो तसे ईश्वराचे भय बाळगू नये. ईश्वरावर प्रेम केले पाहिजे. जेव्हा एखाद्यावर प्रेम मोठ्या प्रमाणात वाढते तेव्हा एक भीती निर्माण होते, परंतु ही भीती काही भयानक गोष्टींमुळे नसते तर ती अत्यंत प्रेमळपणामुळे असते.  ही भीती आपल्याला ज्यांच्यावर प्रेम आहे त्याच्या आज्ञा मोडण्यापासून प्रतिबंध करते.   ही जी प्रेमाची / भीतीची भावना आहे त्याला "तकवा" म्हणतात ज्याची शिफारस कुरअाण करते. "..... जे श्रद्धावान आहेत - त्यांना अल्लाह सर्वाधिक प्रिय आहे ...."  कुरआन २:१६५ कुरआन असे म्हणतो, विश्वास ठेवणारा (श्रद्धावान) ईश्वराचे खूप स्मरण करतो.  त्याचबरोबर  कुरआन विश्वास ठेवणाऱ...

पारलौकिक जिवणाशिवाय मानवता असू शकते का?

पारलौकिक जिवणाशिवाय मानवता असू शकते का? " वास्तविक, माझा मानवतेवर विश्वास आहे. आणि धर्मावर नाही" ******************* अ : मानवता - परलोकावर विश्वास न ठेवता? 'माझा मानवतेच्या धर्मावर विश्वास आहे'. 'आधी चांगला माणूस व्हा आणि मग व्हा ...... ' 'स्वर्ग / नरक कोणी पाहिले आहे?  मग आपण यावर विश्वास का ठेवला पाहिजे? ' जेव्हा जेव्हा परलोक/ श्रद्धा / ईश्वर या मुद्द्यावर बोलले जाते  तेव्हा आपल्याला असे वाक्प्रचार ऐकायला मिळतात. जे असे वक्तव्य करतात त्याच्यासमोर कदाचित देव आणि परलोक यांची खरी कल्पना मांडली गेली नसावी.  जेव्हा कोणतीही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित वस्तू देव मानली जाते, तेव्हा कोणत्याही तार्तिक किंवा तर्कसंगत व्यक्तीला श्रद्धेची व ईश्वराची ही संकल्पना मान्य असणार नाही.  “माझा मानवतेवर विश्वास आहे.” मानवता म्हणजे काय? मानवी किंवा अमानवीय काय आहे हे कोण ठरवेल? नैतिकता किंवा अनैतिकतेचे मापदंड काय असेल हे कोण ठरवेल?  दरोडेखोरांना असे वाटेल की लोकांच्या मौल्यवान वस्तू लुटून तो स्वत: साठी आणि आपल्या कुटूंबासाठी कायदेशीर कमाई करतो त्यावर त्...