आपण ईश्वरावर प्रेम केले पाहिजे की ईश्वराचे भय बाळगले पाहिजे?
आपण ईश्वरावर प्रेम केले पाहिजे की ईश्वराचे भय बाळगले पाहिजे? प्रश्न: आपण ईश्वरावर प्रेम केले पाहिजे किंवा ईश्वराचे भय बाळगले पाहिजे? माझा विश्वास आहे की, भीती ही ईश्वराचे आज्ञापालन करण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे. *************** उत्तरः अरबी शब्द "तकवा" हा सहसा "भीती" म्हणून चुकीचा अनुवाद केला जातो. मूळ शब्द "वाव काफ या" हे प्रेमास एकरूप करते. आपण प्राणी, भूत किंवा वाईट लोकांना घाबरतो तसे ईश्वराचे भय बाळगू नये. ईश्वरावर प्रेम केले पाहिजे. जेव्हा एखाद्यावर प्रेम मोठ्या प्रमाणात वाढते तेव्हा एक भीती निर्माण होते, परंतु ही भीती काही भयानक गोष्टींमुळे नसते तर ती अत्यंत प्रेमळपणामुळे असते. ही भीती आपल्याला ज्यांच्यावर प्रेम आहे त्याच्या आज्ञा मोडण्यापासून प्रतिबंध करते. ही जी प्रेमाची / भीतीची भावना आहे त्याला "तकवा" म्हणतात ज्याची शिफारस कुरअाण करते. "..... जे श्रद्धावान आहेत - त्यांना अल्लाह सर्वाधिक प्रिय आहे ...." कुरआन २:१६५ कुरआन असे म्हणतो, विश्वास ठेवणारा (श्रद्धावान) ईश्वराचे खूप स्मरण करतो. त्याचबरोबर कुरआन विश्वास ठेवणाऱ